शिलाहार काळातील हे प्रसिध्द बंदर रायगड जिल्ह्याच्या मध्यभागी असुन दाट डोंगरांनी वेढलेले आहे. पूर्वी या बंदरातून मुंबईपर्यंत मिठ, मासे व तांदुळ यांची वाहतुक चालत असे. तसेच इ.स. १९१४ पसुन काही वर्ष या बंदरात स्टीम बोटींद्वारे वाहतूक चालत असे. सध्या हे बंदर गाळाने भरल्यामूळे आता जलवाह्तूक होत नाही.
विस हजार लोकसंख्येच्या या शहरास फार जुना ऐतिहासीक वारसा आहे. शिलाहार राजे नागार्जुन याच्या काळात संपन्न अशा कोकणास उतरती कळा लागली व भाऊबंदकीमूळे कदंब नुपती द्वितीय गुहल्लदेव याने कोकणावर हल्ला केला व जनतेचा छ्ळ सुरु केला. पुढे नागार्जुनाचा पुत्र अनंतदेव याने संकटातून देशाची मुक्तता केली. अनंतदेवाचा उल्लेख असलेला फक्त एक ताम्रपट सापडला आहे. ज्यात त्याने आपल्या मंत्र्यांना शुर्पारक, चैमुल्य व नागोठणे या बंदरात करमाफी दिल्याचा उल्लेख आहे.
१७९६ साली पेशव्यांनी जेव्हा मानाजीस सरखेली देउन जयसिंग या अनौरस पुत्रास कारभारी म्ह्अणून नेमल्यावर मानाजीच्य आईने जयसिंगास कैदेत टाकले तेव्हा त्याची बायको सखवरबाई हिने नागोठणे येथे स्थायिक होउन आंग्रेंविरुध्द बंड पुकारले. व तिच्यामुळेच जयसिंगास पुण्याकडे जाऊन पेशव्यांची मदत घेणे शक्य झाले.
सन १५३० पर्यंत नागोठण्यास गुजरातची सत्ता होती. सुलतानाचा पराभव करुन हे शहर पोर्तुगिजांनी जिंकले व नंतर त्याचा ताबा निजामाकडे गेला , यानंतर मुघलांच्या ताब्यातून दहा वर्षांनी शिवरायांनी नागोठणे त्यांच्या राज्यात आणले.
१५८० साली काझी अल्लाऊद्दीन ने बांधलेला अंबा नदीवरील पुल हे नागोठण्याचे प्रमुख आकर्षण आहे. चुना व अंड्याचे मिश्रण एकत्र करुन बनवलेला हा पुल १९८९ च्या महाभयंकर प्रलयाचे व इतर अनेक छोट्या मोठ्या पुरांचे तडाखे सोसुनसुध्दा हा पुल आजही दिमाखात उभा आहे.
आज हे शहर औद्योगिकीकरणात आपली ऐतिहासीकता गमावून बसले असले तरी शहराच्या आजुबाजुचा परिसर आजही आपली निसर्गरम्यता शाबुत ठेवुन आहे.
येथून चार कि.मी. अंतरावर असलेल्या सुकेळी खिंडीत असलेला बारमाही धबधबा पावसाळ्यात आपल्या आक्रमकतेने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो व त्यांना थांबावयास भाग पाडतो. शहराचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचे जाग्रुत देवस्थान, तीन तळ्यांच्या मधोमध असलेले हे भव्य मंदिर पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात. शहराच्या आजुबाजुस अनेक सौंदर्यदृश्ये असल्याने येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा होत असते.
गणेशमुर्तींची जागतीक बाजारपेठ असलेले पेण शहर येथुन फक्त २९ कि.मी. वर आहे. तसेच अष्टविनायक क्षेत्र बल्लाळेश्वराचे पाली येथुन फक्त १० कि.मी. वर आहे.
नागोठणे येथे निवासाची सोय एस.टी.स्टन्ड समोर असलेल्य आनंद लौज येथे होवू शकते. मुंबईहून १०० कि.मी. व पुण्याहून १२५ कि.मी. असलेले हे शहरवजा गाव एक दिवसात पाहुन होण्यासारखे आहे. थेट बसेस उपलब्ध आहेत.
For more http://www.abhayaranya.com

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home